सुप्रियाताई सुळे यांनी स्व. वसंतदादांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले.

सांगली येथे स्व.वसंतदादा पाटील, स्व.प्रकाशबापू पाटील, स्व.विष्णुअण्णा पाटील व स्व.मदनभाऊ पाटील यांच्या समाधीस्थळांना भेट देऊन संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांनी अभिवादन केले. याप्रसंगी समवेत अनेक मान्यवर तथा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्व.वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने सांगलीच्या, महाराष्ट्राच्या व पर्यायाने देशाच्या विकासात मोलाची भूमिका पार पाडली आहे. आज त्यांच्या गौरवशाली कार्याचा वारसा तितक्याच दैदिप्यमानतेने चालवला जात आहे याचे समाधान असून महाराष्ट्र त्यांच्या कार्याला कदापी विसरू शकणार नाही अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

स्व.वसंतदादांच्या कार्याचा समृद्ध वारसा पाठीशी आहे. इथला सर्वसामान्य माणूस अधिक सामर्थ्यवान व्हावा, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी दादांच्या कार्यास सर्वसमावेशक असा दृष्टिकोन अंगी बाळगून कार्यरत आहे, असे याप्रसंगी नमूद केले.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *