प. पु. १०८ आचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांच्या ६७ व्या पुण्यतिथी निमित्त वीर सेवा दल मध्यवर्ती समिती मार्फत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून अभिवादन केले.
प्रथमाचार्य आचार्य शांतीसागरजी महाराज यांचे त्यागी जीवन हे अमूल्य आहे. त्यांची अफाट बुद्धिमत्ता अनेक बुद्धिवंतांना व शास्त्रज्ञांना नतमस्तक होण्यास भाग पाडणारी आहे. त्यांच्या विचारांशी समरूप होणे व मार्गक्रमण करणे हीच त्यांच्या स्मृतींना खरी आदरांजली ठरेल. याप्रसंगी अनेक राजकीय मान्यवर, दक्षिण भारत जैन सभेचे व वीर सेवा दलाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.



![]()
